Bihar Election Results : 10 हजारांच्या योजनेमुळं महिलांनी पटलवला गेम? बिहारवर शरद पवारांचा तर्क अन् आयोगाला सवाल

WhatsApp Channel Join Now
Telegram Group Join Now

बिहार विधानसभा निवडणुकीत राष्ट्रीय लोकशाही आघाडी (NDA) ने प्रचंड विजय मिळवला आहे. या विजयामागे महिला फॅक्टर असल्याची जोरदार चर्चा सुरु झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी या निकालावर प्रतिक्रिया देताना, निवडणुकीपूर्वी महिलांच्या खात्यात प्रत्येकी १० हजार रुपये जमा करण्यात आल्याने हा निकाल लागल्याचा दावा केला आहे. त्यांनी निवडणूक आयोगाने अशा गैरमार्गाचा विचार करावा, असे म्हटले आहे. पवारांनी सरकारी तिजोरीतून निवडणूक प्रचारासाठी पैसे वापरले जात असल्याबद्दल तीव्र आक्षेप घेतला.

या निवडणुकीत महिलांचा मतदानाचा टक्का पुरुषांपेक्षा अधिक होता (महिला ७१.०६%, पुरुष ६६.९१%). याच ‘मुख्यमंत्री महिला रोजगार योजने’अंतर्गत १ कोटी ३० लाख महिलांच्या खात्यात १०-१० हजार रुपये टाकण्यात आले होते. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते संजय राऊत यांनीही निवडणूक आयोगावर निशाणा साधत भाजप आणि आयोगाच्या संगनमताचा आरोप केला आहे. निवडणुकीच्या निकालानंतर मुख्यमंत्रीपदाबाबत चर्चा सुरु आहे. भाजपने सर्वाधिक जागा जिंकल्या असल्या तरी, नितीश कुमार यांच्या मुख्यमंत्रीपदासाठी जनता दल युनायटेडने (जेडीयू) दावा केला आहे.

Source

Latest Jobs
All India Jobs
Home
Hall Ticket
Result
Join Our WhatsApp Group!