तेजस्वी यादव यांच्या सभेला AIची गर्दी होती का? उद्धव ठाकरेंचा सवाल

WhatsApp Channel Join Now
Telegram Group Join Now

उद्धव ठाकरे यांनी बिहार निवडणुकीच्या निकालांबाबत आश्चर्य व्यक्त करत, राष्ट्रीय जनता दलाचे नेते तेजस्वी यादव यांच्या सभांना झालेली प्रचंड गर्दी खरी होती की एआय तंत्रज्ञानाने तयार केलेली होती, असा सवाल उपस्थित केला. “ज्यांच्या सभांना अलोट गर्दी होते, त्यांचे सरकार येत नाही, तर ज्यांच्या सभांना रिकाम्या खुर्च्या दिसतात, त्यांचे सरकार येते,” हे लोकशाहीतील नवीन गणित अनाकलनीय असल्याचे त्यांनी म्हटले.

ठाकरे यांनी निवडणूक आयोगाच्या कार्यपद्धतीवरही टीका केली. महाराष्ट्रातही मतदार यादीतील त्रुटी, दुबार मतदार नोंदणी आणि बोगस पत्त्यांसारख्या समस्यांवर निवडणूक आयोगाने लक्ष दिले नाही, असे त्यांनी नमूद केले. निवडणुका हा लोकशाहीचा आत्मा आहे, परंतु त्यात पारदर्शकता नसेल तर त्याला लोकशाही म्हणता येणार नाही, असे ते म्हणाले. प्रादेशिक पक्षांना संपवण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना देशातून संपवले जाईल, असा इशाराही त्यांनी दिला.

 

Source

Latest Jobs
All India Jobs
Home
Hall Ticket
Result
Join Our WhatsApp Group!