राहुल गांधी आणि तेजस्वी यादवांची जोडी बिहारमध्ये अपयशी; पराभूत होण्यामागची कारणे कोणती ?

Bihar Election Result 2025 |
WhatsApp Channel Join Now
Telegram Group Join Now

Bihar Election Result 2025 | बिहार विधानसभा निवडणुकीत एनडीएनं पुन्हा एकदा बाजी मारली आहे. एकूण २४३ जागा असणाऱ्या विधानसभेत सत्ताधारी आघाडीने थेट २०० चा पल्ला पार केला. तर महाआघाडीला  फक्त ३४ जागांवर समाधान मानावं लागलं. एनडीएने २०० पेक्षा अधिक जागा जिंकून प्रचंड बहुमत मिळवलं आहे. मात्र महाआघाडीच्या पराभवाची काही कारणे आहेत. ती कोणती ते जाणून घेऊयात..

छठवर राहुल गांधी यांची वक्तव्यबाजी

बिहारचा प्रमुख सण छठ संपताच राहुल गांधी २९ ऑक्टोबरला मुजफ्फरपुरला आले होते. तिथे त्यांनी एका सभेला संबोधित करताना नरेंद्र मोदींवर निशाणा साधत म्हटलं की मोदींना छठ पूजेशी काही देणंघेणं नाही. त्यांना फक्त मतं हवीत. त्यासाठी ते व्यासपीठावर नृत्य-नाटकही करतील. बिहारमध्ये हे आस्थेच्या सण छठचा अपमान मानलं गेलं. सत्ताधारी एनडीएने याला छठ आणि बिहारचा अपमान म्हटलं. भाजपने याला राहुलची हिंदूविरोधी वर्तणूक म्हटलं.  राहुल यांच्या या वक्तव्यामुळे भाजप हिंदू मतांचं ध्रुवीकरण करण्यात यशस्वी झाली.

तेजस्वी यांची ओवैसींवर टीका 

तेजस्वी यादव यांनी ऑक्टोबरमध्ये AIMIM प्रमुख असदुद्दीन ओवैसी यांच्याबाबत अशी टिप्पणी करून टाकली, जी मुस्लिमांना नाराज करण्यासाठी पुरेशी होती. महाआघाडीच्या बाजूने मुस्लिम मतं साधण्यासाठी तेजस्वी यांनी ओवैसींना चरमपंथी म्हटलं होतं. ओवैसींनी याला मुस्लिमांचा अपमान म्हटलं. राहुल गांधी यांनीही याला अप्रत्यक्ष पाठिंबा दिला होता.

ओवैसींनी सीमांचलच्या आपल्या सभांमध्ये हा मुद्दा खूप उचलला. यामुळे सीमांचलच्या मुस्लिमबहुल २४ जागांवर परिणाम झाला. मुस्लिम मतं विभागली गेली आणि ओवैसींच्या पक्षाने ५ जागा जिंकल्या. बिहारमध्ये मुस्लिम लोकसंख्या सुमारे १७ टक्के आहे. मुस्लिम मतांचं विखुरले जाणं महाआघाडीच्या दुर्दशेचं कारण ठरलं.

मुस्लिमांना कमी लेखणं

मुस्लिम-यादव समीकरणाला आधार बनवून चालणाऱ्या पक्ष आरजेडीने आपल्या हिस्स्यातील १४३ जागांमध्ये फक्त १८ मुस्लिमांना दिल्या, तर यादव जातीयांना ५० पेक्षा अधिक जागा मिळाल्या. एवढंच नव्हे तर, बिहारचे सीएम आणि उपमुख्यमंत्री यांच्या नावांची महाआघाडीच्या पत्रकार परिषदेत घोषणा झाली, तेव्हाही मुस्लिमांनी स्वतःला उपेक्षित वाटलं. ३ टक्क्यांपेक्षा कमी लोकसंख्या असलेल्या व्हीआयपी प्रमुख मुकेश साहनी यांना महाआघाडीचा उपमुख्यमंत्री चेहरा घोषित करण्यात आला, तर १७ टक्के लोकसंख्या असलेल्या मुस्लिमांबाबत गठबंधनाने मौन बाळगलं. महाआघाडीला मुस्लिमांच्या या नाराजीचा फटका बसला. Bihar Election Result 2025 |

‘यादव राज’ पुन्हा येणार हा संदेश 

राजदने ५२ तिकिटे ही यादव समाजातील उमेदवारांना दिली. यामुळे हा पक्ष जातीयवाद पाळतो, असा आरोप विरोधकांनी जनतेपर्यंत नेला. बिहारमध्ये यादव जातीची लोकसंख्या १४ टक्के आहे. या व्होटबँकेच्या भरवशावर पक्षाने १४४ जागांपैकी ५२ तिकिटे केवळ यादव समाजाला दिल्याने ‘यादव राज’ पुन्हा येणार हा भाजपचा संदेश सर्व थरापर्यंत गेला. परिणामी बिगर यादव, मागास, अतिमागास जाती राजदपासून दूर गेल्या.

तेजस्वी समर्थकांचे वाकडे बोल

सोशल मीडियावर आणि सभांमध्ये आक्रमक वक्तव्ये देऊन त्यांनी सवर्ण आणि गैर-यादव ओबीसी जातीय मतदारांना नाराज केलं. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या आईला महाआघाडीच्या सभांमध्ये शिवीगाळ करण्यात आली. ‘भूराबाल’ (भूमिहार, राजपूत, ब्राह्मण आणि कायस्थ) साफ करा असा नारा उचलून आरजेडी नेते-समर्थकांनी सवर्ण मतदारांना नाराज केलं.

नीतीश कुमार यांचा वारंवार अपमान

लोकसभा निवडणुकीच्या अगोदर २०२४ मध्ये जेव्हा नीतीश कुमार यांनी महाआघाडीशी नातं तोडलं तेव्हा तेजस्वी यादव त्यांच्याबाबत आक्रमक झाले. त्यांना म्हातारा, आजारी आणि लाचार मुख्यमंत्री सिद्ध करण्याचं त्यांनी मोहीम छेडली. राहुल आणि तेजस्वी यांनी आपल्या सभांमध्ये नीतीश कुमारांना पलटू राम म्हटलं. यामुळे नीतीश यांच्या लव-कुश मतदार आणि अति पिछडा वर्गात नकारात्मक संदेश गेला. महाआघाडीच्या पराभवानंतर भाजपनेही  नीतीशचं अपमान हे बिहारचं अपमान असल्याचे म्हंटले होते.  Bihar Election Result 2025 |

तेज प्रतापचं निष्कासन

आरजेडीची दुर्दशा होण्याचं एक कारण तेज प्रताप यादवही ठरले. त्यांच्या वडिलांनी लालू यादव यांनी निवडणुकीपूर्वी त्यांना पक्ष आणि कुटुंबातून निष्कासित केलं होतं. याच वर्षी मे महिन्यात लालूंनी तेज प्रतापांना ६ वर्षांसाठी आरजेडीमधून बाहेर काढलं होतं. यामुळे हा संदेश गेला की जो माणूस कुटुंब सांभाळू शकत नाही, तो राज्य कसं सांभाळेल. तेज प्रताप यांनी नंतर आपली स्वतंत्र पक्ष जनशक्ती जनता दल बनवला होता. महुआमधून त्यांनी आरजेडीविरोधात निवडणूक लढवली. ते जिंकले नाहीत, पण अनेक जागांवर उमेदवार उभे करून त्यांनी तेजस्वीचा खेळ बिघडवण्याचं काम केला. तेजप्रतापमुळे यादवांच्या मतांमध्ये फूट पडली आणि हे तेजस्वींसाठी घातक ठरलं.

हेही वाचा : 

अवघ्या तीन महिन्यांचं लेकरु पोरकं झालं; बापाचं छत्र कायमचं गेलं : नवले ब्रीज अपघातात मराठी अभिनेत्याचा दुर्देवी अंत

The post राहुल गांधी आणि तेजस्वी यादवांची जोडी बिहारमध्ये अपयशी; पराभूत होण्यामागची कारणे कोणती ? appeared first on Dainik Prabhat.

Source

Latest Jobs
All India Jobs
Home
Hall Ticket
Result
Join Our WhatsApp Group!