Bihar Election 2025 : “मत चोरांनी त्यांचे सिंहासन सोडावे…”; बिहार निवडणुकीच्या निकालावर काँग्रेसची संतप्त प्रातिक्रिया

WhatsApp Channel Join Now
Telegram Group Join Now

Bihar Election 2025 – पूर्वी आम्ही गोऱ्यां साहेबांशी लढलो, आता आम्ही मत चोरांशी लढू. मत चोरांनी त्यांचे सिंहासन सोडावे. पंतप्रधान मोदी ज्याला पसंती देतील तो जिंकेल, जो मोदी पसंती देतील तो हरेल, असे निवडणुकीचे सध्याचे चित्र आहे, असे प्रतिपादन काँग्रेस नेते पवन खेडा यांनी केले आहे. बिहारचे निकाल आश्चर्यकारक नाहीत, असेही ते म्हणाले.

बिहार विधानसभा निवडणुकीची मतमोजणी सुरू असताना २४, अकबर रोड, दिल्ली येथील काँग्रेस कार्यालयाबाहेर कार्यकर्त्यांनी निवडणूक आयोग आणि भाजपा विरोधात फलक हातात धरून निदर्शने केली.

दरम्यान, पवन खेडा यांनी २०२५ च्या बिहार विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीच्या ट्रेंडवर सांगितले की, हे सुरुवातीचे ट्रेंड आहेत आणि आम्ही थोडी वाट पाहत आहोत.

सुरुवातीचे ट्रेंड निश्चितच सूचित करतात की, ज्ञानेश कुमार गुप्ता बिहारच्या लोकांवर वर्चस्व मिळवत आहेत. परंतु येत्या काही तासांत बिहारचे लोक ज्ञानेश कुमार गुप्तांवर विजय मिळवतील की ज्ञानेश कुमार गुप्ता विजयी होतील हे स्पष्ट होईल.

बिहार काँग्रेसचे सह-प्रभारी देवेंद्र यादव यांनी म्हटले आहे की, हे सुरुवातीचे कल आहेत. पण आम्ही निवडणूक आयोगाच्या उणीवा जनतेसमोर उघड करत आहोत. निकालानंतर राजद हाच सर्वात मोठा पक्ष राहील.

The post Bihar Election 2025 : “मत चोरांनी त्यांचे सिंहासन सोडावे…”; बिहार निवडणुकीच्या निकालावर काँग्रेसची संतप्त प्रातिक्रिया appeared first on Dainik Prabhat.

Source

Latest Jobs
All India Jobs
Home
Hall Ticket
Result
Join Our WhatsApp Group!