गुन्हेगारांना, नेत्यांना जामीन..; रोहित पवारांचे सरकारवर गंभीर आरोप

WhatsApp Channel Join Now
Telegram Group Join Now

रोहित पवारांनी ट्वीट करत महाराष्ट्र सरकारवर गंभीर टीका केली आहे. त्यांनी गुन्हेगारांना जामीन, नेत्यांना जमीन ही सरकारची नवी योजना असल्याचा आरोप केला आहे. ही योजना वोटचोरी आणि जमिनीची लूटमारी करण्यासाठी असल्याचा दावा त्यांनी केला. पवारांनी आपल्या ट्वीटमध्ये अनेक कथित भूखंड प्रकरणांचा उल्लेख करत सरकारला घेरले आहे.

त्यांच्या आरोपानुसार, नवी मुंबईत शिंदे गटाने ५००० कोटींची सिडको जमीन, पुण्यात देवेंद्र फडणवीस यांच्या भाजपने १८०० कोटींची जैन बोर्डिंग जमीन, संभाजीनगरमध्ये शिंदे गटाने एमआयडीसीची राखीव जमीन आणि देवेंद्र फडणवीस यांच्या भाजपने २०० कोटींची अंजली टॉकीजची जमीन घेतली आहे. तसेच, पुण्यात अजित पवारांच्या गटाने ३०० कोटींची कोरेगाव पार्क जमीन, तर अहिल्यानगरमध्ये जैन समाजाची जमीन घेतल्याचा आरोप पवारांनी केला. नवी मुंबई विमानतळाजवळ ३००० कोटींचा अवैध गौण खनिज उत्खनन घोटाळा, मुंबईत देवेंद्र फडणवीस यांच्या भाजपने एसआरएच्या हजारो कोटींच्या जमिनी आणि नाशिकमध्ये शिंदे गटाने त्र्यंबकेश्वर येथील जमीन घेतल्याचा उल्लेखही त्यांनी केला.

Source

Latest Jobs
All India Jobs
Home
Hall Ticket
Result
Join Our WhatsApp Group!