
दक्षिण अफ्रिकेने विजयाठी दिलेल्या 124 धावांचं सोपं आव्हान भारतीय संघाला गाठता आलं नाही. त्यामुळे भारतीय संघाला लाजिरवाणा पराभवाला सामोरं लागलं. या धावांचा पाठलाग करताना भारतीय संघ 93 धावांवर बाद झाला. दक्षिण अफ्रिकेने भारताचा 30 धावांनी पराभव केला. या पराभवामुळे दक्षिण अफ्रिकेने मालिकेत 1-0 ने आघाडी घेतली आहे. त्यामुळे दुसऱ्या कसोटी सामन्यात भारतीय संघावर दडपण असणार आहे. न्यूझीलंडनंतर दक्षिण अफ्रिकेकडून क्लीन स्विपचं संकट असणार आहे, त्यामुळे भारतीय संघाला दुसऱ्या कसोटी सामन्यात करो या मरोची लढाई आहे. असं असताना भारताला विजयापासून कसं रोखलं याचं गणित दक्षिण अफ्रिकेचा कर्णधार टेम्बा बावुमाने सांगितलं. कसं काय झालं याचं विश्लेषण त्याने सामन्यानंतर केलं.
कर्णधार टेम्बा बावुमा म्हणाला की, ‘तुम्हाला अशा प्रकारच्या सामन्यांचा भाग व्हायचे असतं आणि निकालाच्या बाजूने राहायचे आहे. मला वाटते की आम्ही शक्य तितकी आमची बाजू टिकवून ठेवण्याचा प्रयत्न केला. आम्हाला माहित होते की फलंदाजी कठीण होणार आहे, आमच्यासाठी ते कठीण होते, परंतु आम्हाला जे काही होते त्याचा फायदा घेण्याची आवश्यकता होती. मला वाटते की आम्ही ते सुंदरपणे केले. सुदैवाने गोष्टी खूप चांगल्या प्रकारे घडल्या आहेत. आमच्या गोलंदाजांनी आम्हाला पुन्हा खेळात आणले.’
हा होता सामन्याा टर्निंग पॉइंट
कर्णधार टेम्बा बावुमा याने सांगितलं की, ‘बॉशसोबतची ती भागीदारी, मला वाटते की दिवसाच्या शेवटी मार्कोसोबतची थोडीशी भागीदारी, यामुळे आज सकाळी आपण थोडे चांगले खेळू शकतो याची थोडीशी प्रेरणा मिळाली. ते तितके टोकाचे नव्हते, परंतु आम्ही भागीदारी करू शकलो. आम्ही शक्य तितके खेळात राहण्याचा प्रयत्न केला. प्रत्येक वेळी तुम्ही 120-125 धावा करता आणि तुम्हाला असे वाटते की ते विजयी धावसंख्या आहे.’
अक्षर पटेलच्या झेलबाबत टेम्बा बावुमा म्हणाला…
कर्णधार टेम्बा बावुमा म्हणाला की, ‘ते सोपे नव्हते. मला आनंद आहे की मला यात हातभार लागला. पुन्हा एकदा महत्त्वाचा क्षण. अक्षर, त्याच्याकडे गती होती आणि भारतीय फलंदाज कसे खेळतात हे आपल्याला माहिती आहे. जेव्हा त्यांच्याकडे गती असते तेव्हा ते आणखी जोरात खेळतात. म्हणून सुदैवाने, तो चूक करू शकला. मी माझ्या छोट्या हातांनी त्याला पकडू शकलो. ते असे क्षण आहेत ज्यांचा तुम्हाला भाग व्हायचे आहे. तुम्हाला ते दुसऱ्या कोणाला द्यायचे नाही. तुम्हाला ते संघासाठी करायचे आहे.’
Welcome to Mhnokari.in – a trusted platform committed to providing the latest, most accurate, and verified updates on government jobs, exam results, admit cards, recruitment notifications, and career opportunities across Maharashtra India. Our team prioritizes thorough research, strict fact-checking, and clear presentation to ensure every user receives reliable, easy-to-understand, and trustworthy information.











