IND vs SA : टीम इंडिया 9 विकेट्सवरच ऑलआऊट, दक्षिण आफ्रिकेविरुद्ध 189 रन्सवर पॅकअप, फक्त 30 धावांची आघाडी

IND vs SA : टीम इंडिया 9 विकेट्सवरच ऑलआऊट, दक्षिण आफ्रिकेविरुद्ध 189 रन्सवर पॅकअप, फक्त 30 धावांची आघाडी
WhatsApp Channel Join Now
Telegram Group Join Now

दक्षिण आफ्रिकेने टीम इंडिया विरूद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यातील दुसऱ्या दिवशी जोरदार कमबॅक केलं आहे. भारताने दक्षिण आफ्रिकेला पहिल्या दिवशी 159 धावांवर गुंडाळलं होतं. त्यानंतर भारताने पहिल्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत 20 ओव्हरमध्ये 1 विकेट गमावून 37 धावा केल्या होत्या. त्यामुळे भारताला आघाडी घेण्यासाठी आणखी 122 धावांची गरज होती. भारताने दुसऱ्या दिवशी आघाडी घेतली. मात्र ती आघाडी नाममात्र ठरली. दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजांसमोर भारताला दुसऱ्या दिवशी 9 विकेट्सच्या मोबदल्यात 152 धावाच करता आल्या. भारताने दक्षिण आफ्रिकेच्या 159 च्या प्रत्युत्तरात 189 धावा केल्या. भारताला यासह फक्त 30 धावांचीच आघाडी घेता आली. त्यामुळे आता भारतीय गोलंदाज दक्षिण आफ्रिकेला दुसऱ्या डावात किती धावांवर रोखण्यात यशस्वी ठरणार हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

Source

Join Our WhatsApp Group!