राज्याचे उपमुख्यंमत्री एकनाथ शिंदे यांनी बिहार विधानसभा निवडणूक 2025 च्या निकालावर आपली प्रतिक्रिया दिली. एकनाथ शिंदेंनी बिहारमधील एनडीएच्या दणदणीत विजयावर भाष्य करताना म्हणाले की, बिहारच्या जनतेने जंगलराज नाकारले असून विकासराज स्वीकारले आहे. यामुळे एनडीएला दणदणीत बहुमत मिळाले आहे. या विजयाचे श्रेय त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री नितीश कुमार आणि बिहारमधील महिला मतदारांना दिले.
महाराष्ट्रात ज्याप्रमाणे महिला मतदारांनी मोठ्या प्रमाणावर मतदान करून लँडस्लाईड विजय मिळवून दिला, त्याचप्रमाणे बिहारमध्येही महिला मतदारांच्या (लाडक्या बहिणी) योगदानातून हे यश मिळाल्याचे शिंदे यांनी नमूद केले. शिंदे यांनी सांगितले की, बिहारमध्ये मोदीजी आणि नितीश कुमार यांनी केलेल्या विकासकामांवर जनतेने विश्वास ठेवला. या निकालामुळे विकासराज सुरू राहणार असून, जंगलराजला जनतेने पूर्णपणे नाकारले आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले. पूर्वीच्या जंगलराजमध्ये संध्याकाळी 6 नंतर लोकांना बाहेर पडणे कठीण होते आणि गुन्हेगारी मोठ्या प्रमाणावर होती, अशी आठवण त्यांनी करून दिली.
Welcome to Mhnokari.in – a trusted platform committed to providing the latest, most accurate, and verified updates on government jobs, exam results, admit cards, recruitment notifications, and career opportunities across Maharashtra India. Our team prioritizes thorough research, strict fact-checking, and clear presentation to ensure every user receives reliable, easy-to-understand, and trustworthy information.











