Bihar Election Results 2025 : सुप्रिया सुळेंकडून नितीश कुमार यांचं कौतुक… बिहार निकालावर महाराष्ट्रात कोण-काय म्हणलं?

WhatsApp Channel Join Now
Telegram Group Join Now

बिहार विधानसभा निवडणूक 2025 च्या निकालांमध्ये राष्ट्रीय लोकशाही आघाडी (एनडीए) ने विजय मिळवल्याचे घोषित केले आहे. एनडीए नेत्यांनी याला नितीश कुमार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील विकासाच्या राजकारणाचा विजय संबोधले आहे. जातीवादी आणि देशविरोधी राजकारणाला बिहारच्या जनतेने कचऱ्याची टोपली दाखवल्याचा दावा भाजपच्या अतुल भातखळकरांकडून  करण्यात आला. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री फडणवीस यांनीही या विजयात त्यांच्या प्रचाराचा महत्त्वाचा वाटा असल्याचे म्हटले आहे. त्यांच्या मते, बिहारच्या जनतेने मोदी आणि नितीश कुमार यांच्या नेतृत्वावर विश्वास दाखवला आहे. दुसरीकडे, विरोधकांनी मात्र या निकालांवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.

निवडणूक आयोगाची भूमिका निरपेक्ष आणि पारदर्शक नसल्याचा आरोप करत, ६५ लाख मतदारांना वगळण्यात आल्यामुळे मतचोरी झाल्याचे काँग्रेसच्या हर्षवर्धन सपकाळ यांचे म्हणणे आहे. दलित, मागासवर्गीय आणि अल्पसंख्याक मतदारांना पद्धतशीरपणे वगळण्यात आल्याचा दावा राहुल गांधींसह विरोधकांनी केला आहे. बिहारमधील हे निकाल केवळ “ट्रेलर” असून, मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकांमध्ये खरा “पिक्चर” दिसेल, असे मत दोन्ही बाजूंच्या नेत्यांनी व्यक्त केले आहे.

Source

Latest Jobs
All India Jobs
Home
Hall Ticket
Result
Join Our WhatsApp Group!