Anjali Damania : भयानक… मोठी फसवणूक, अजितदादांच्या राजीनाम्याची मागणी करत दमानियांचा गंभीर आरोप

WhatsApp Channel Join Now
Telegram Group Join Now

सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी पार्थ पवार भूखंड घोटाळा प्रकरणी उपमुख्यमंत्री अजित पवारांनी तातडीने राजीनामा द्यावा अशी मागणी केली आहे. सरकारी जमिनींमध्ये बनावट कागदपत्रे वापरून गैरव्यवहार करणे हे भारतीय दंड संहितेच्या कलम ४२०, ४६६, ४६८, ४७१, ४४१, ४४२, ४४७ आणि इतर संबंधित कलमांखाली गंभीर गुन्हे आहेत, ज्यात ७ ते १४ वर्षांपर्यंत शिक्षा आणि दंडाची तरतूद आहे, असे दमानिया यांनी स्पष्ट केले.

या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी नेमलेल्या समितीच्या निष्पक्षतेवरही दमानिया यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. सहा पैकी पाच अधिकारी पुण्याचेच असल्यामुळे ते उपमुख्यमंत्र्यांच्या मुलाची चौकशी कशी करू शकतील, असा सवाल त्यांनी केला. शीतल तेजवानी यांनी ३० डिसेंबर रोजी लिहिलेल्या पत्राचा संदर्भ देत, अमिडिया कंपनी आणि एका पॉवर ऑफ अटर्नीद्वारे झालेल्या व्यवहारात अनेक अनियमितता असल्याचा दावा दमानिया यांनी केला. ही पॉवर ऑफ अटर्नी नोंदणीकृत नसून, विक्रीचे अधिकारही त्यात नाहीत, ज्यामुळे हा व्यवहार पूर्णतः फसवणूक असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. दमानिया यांनी पुणे जिल्हाधिकाऱ्यांच्या भूमिकेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित करत, त्यांना तात्काळ निलंबित करण्याची मागणी केली.

Source

Join Our WhatsApp Group!