दिल्लीतील लाल किल्ल्याजवळ झालेल्या स्फोटावर समाजवादी पक्षाचे नेते अबू आझमी यांनी तीव्र प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी या घटनेला सुरक्षा आणि गुप्तचर विभागाचे मोठे अपयश म्हटले आहे. दिल्ली ही देशाची राजधानी असून, अशा ठिकाणी स्फोट होणे हे चिंताजनक आहे, असे आझमी यांनी म्हटले आहे.
गुन्हेगारांना सहा महिन्यांत फाशीची शिक्षा व्हावी, अशी मागणी करत असतानाच, त्यांनी निर्दोष लोकांना खोट्या आरोपाखाली अटक करू नये, यावरही अबू आझमी यांनी भर दिला. मुंबईतील ट्रेन स्फोटात १८७ लोकांचा मृत्यू होऊनही दोषींना शिक्षा झाली नाही, उलट काही निर्दोष लोकांना १९ वर्षांपर्यंत तुरुंगात ठेवण्यात आले, असे त्यांनी सांगितले. न्यायालयात ते निर्दोष सिद्ध झाले. अशाप्रकारे आपल्या अपयशावर पांघरूण घालण्यासाठी कोणालाही विनाकारण त्रास देऊ नये, असे आझमी यांनी स्पष्ट केले.
Welcome to Mhnokari.in – a trusted platform committed to providing the latest, most accurate, and verified updates on government jobs, exam results, admit cards, recruitment notifications, and career opportunities across Maharashtra India. Our team prioritizes thorough research, strict fact-checking, and clear presentation to ensure every user receives reliable, easy-to-understand, and trustworthy information.











