
महाड : महाड तालुक्यातील कुणबी समाजातील प्रभावशाली युवा चेहरा सुशांत गणेश जाबरे यांची राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) युवक काँग्रेसच्या राज्य उपाध्यक्षपदी नियुक्ती झाली आहे. पक्षप्रवेशानंतर अवघ्या काही आठवड्यांत मिळालेली ही जबाबदारी राष्ट्रवादीच्या धोरणात्मक रणनीतीचा भाग मानली जात आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार आणि प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे यांच्या उपस्थितीत ही घोषणा करण्यात आली.
गेम चेंजर नियुक्ती
जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय राष्ट्रवादीसाठी ‘गेम चेंजर’ ठरणार असल्याचे मानले जात आहे. तरुण, ऊर्जावान आणि सामाजिक उपक्रमांमधून सक्रिय असलेल्या जाबरे यांनी अल्पावधीतच युवकांमध्ये मजबूत पकड निर्माण केली आहे. त्यांचा संघटनात्मक दृष्टिकोन आणि जनसंपर्क यामुळे ते महाडच्या राजकारणात बलाढ्य युवा नेता म्हणून उदयास आले आहेत.
भरत गोगावले गटाला मोठा धक्का
जाबरे हे यापूर्वी भरत गोगावले यांचे विश्वासू सहकारी म्हणून ओळखले जात होते. मात्र, गोगावले गटात कार्यकर्त्यांना योग्य स्थान न मिळाल्याची नाराजी होती. जाबरे यांच्या झपाट्याने झालेल्या उन्नतीकडे आता दुर्लक्षित कार्यकर्त्याचा विजय’ म्हणून पाहिले जात आहे. या नियुक्तीमुळे गोगावले गटाला मोठा राजकीय धक्का बसला आहे.
तटकरे-पवारांची रणनीती यशस्वी
सुनिल तटकरे यांनी हा प्रवेश आणि नियुक्ती कौशल्याने साध्य करत राष्ट्रवादीला महाडमध्ये मोठे बळकटीकरण दिले आहे. स्थानिक पातळीवर प्रभावी नेतृत्व उभे करण्याच्या दृष्टीने ही हालचाल अत्यंत महत्त्वाची ठरते आहे. जाबरे यांच्या राज्यस्तरीय जबाबदारीमुळे पक्षाला कुणबी समाज आणि युवा मतदारांमध्ये नवसंजीवनी मिळेल, असा विश्वास पक्षातील सूत्रांनी व्यक्त केला आहे.
नवे शक्तिसमीकरण
महाडच्या राजकीय रणांगणात आता नव्या शक्तिसमीकरणांची चाहूल लागली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने कुणबी समाज आणि युवकांना केंद्रस्थानी ठेवत रणनीतिक आघाडी उघडली असून, येत्या निवडणुकांमध्ये याचा मोठा फायदा होईल, अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.
The post Raigad Politics : सुनील तटकरेंचा मास्टरस्ट्रोक ! गोगावलेंच्या समर्थकाला पक्षात घेत थेट राज्यपातळीवर दिली ‘ही’ जबाबदारी appeared first on Dainik Prabhat.
Welcome to Mhnokari.in – a trusted platform committed to providing the latest, most accurate, and verified updates on government jobs, exam results, admit cards, recruitment notifications, and career opportunities across Maharashtra India. Our team prioritizes thorough research, strict fact-checking, and clear presentation to ensure every user receives reliable, easy-to-understand, and trustworthy information.











